Uncategorized

जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद बुधवारी, उद्योजक आणि महाराष्ट्र शासन यांच्यात होणार सामंजस्य करार

रत्नागिरी – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उद्या बुधवारी दि. 9 एप्रिल रोजी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद होणार आहे. जिल्ह्यातील उद्योजक या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र शासनासोबतम यावेळी सामंज्यस्य करार करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य अजगेकर यांनी दिली.

या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत उद्योगाशी संबंधित सर्व विभाग व त्यांचे प्रतिनिधी उदा. एमआयडीसी, कामगार विभाग, निर्यातीशी संबंधित डीजीएफटी व निर्यातदार वित्त पुरवठाशी निगडीत बँका उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

कोकण ऑनलाईन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button